Home Breaking News अभ्यासातील सातत्य व योग्य नियोजन यशापर्यंत पोहचविते जयश्री नवखरे यांचे प्रतिपादन

अभ्यासातील सातत्य व योग्य नियोजन यशापर्यंत पोहचविते जयश्री नवखरे यांचे प्रतिपादन

39

अभ्यासातील सातत्य व योग्य नियोजन यशापर्यंत पोहचविते जयश्री नवखरे यांचे प्रतिपादन

चंद्रपूर :किरण घाटे

विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून जाऊ नये ,अभ्यासात सदैव सातत्य ठेवल्याने यश पदरी पडतेच अभ्यासात सातत्य ठेवा, तेव्हाच आपल्याला यशाच्या जवळ पोहोचता येते माणसाला पराजय सुद्धा पचवता येणे गरजेचे आहे. आयुष्यात जय पराजय हे येतच असतात, त्याला प्रत्येकाने सामोरे गेलेच पाहिजे.

अपयश ही यशाची पहिली पायरी त्यामुळे मनन चिंतन करून ध्येय निश्चित करा व सातत्याने त्याचा पाठलाग करा. यश नक्की मिळतेच एवढेच नव्हे तर तुम्ही ज्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकला त्या शिक्षकांनी प्राध्यापकांनी तुम्हाला घडविले ज्या आई-वडिलांनी संस्कार करून, पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला ज्या विज्ञान शाखेत शिकविले त्यांना विसरू नका खूप मोठे व्हा सोबतच आई-वडिलांचे व महाविद्यालयाचे नाव मोठे करा.

असे प्रतिपादन जयश्री नवखरे यांनी केले त्या यशोदा बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित जिविका इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वर्ग १२ वीच्या विज्ञान शाखा भिसीच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होत्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सारंग देशपांडे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापिका शुभांगी आष्टनकर उपस्थित होते .

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक किशोर आष्टनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अभ्यासात अ सातत्य व सद्गुण अंगी बाळगले तर यश निश्चितच पदरात पडते त्यामुळे कुठेही घाबरून न जाता परीक्षेला आत्मविश्वासाने समोर जा यश तुमच्या पदरात नक्की पडतेच

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सारंग देशपांडे यांनी जीवनात विद्यार्थ्यांनी उंच ध्येय गाठा परंतु ज्या शाळांनी तुम्हाला घडविले त्या शाळेला विसरू नका. शिक्षकांशी नेहमी मधूर सबंध ठेवा आपल्याला आवडणारे क्षेत्रामध्ये करिअर करा चांगले नागरिक बना असा मोलाचा सल्ला दिला. यावेळी बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात प्रामुख्याने सायली मुंगले, पायल चुटे ,भाग्यश्री मुंगले , पूजा ठाकरे ,विनय बानकर , खुशी ठोंबरे ,मंथन धनविजय , श्रुती बन्सोड , पूजा ठाकरे , सुहानी सूर्यवंशी , सेजल एकोणकर , वैष्णवी चिकटे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देऊन कठीणातल्या कठीण प्रसंगावर कशी मात करता येईल हे सांगितले जीवनातील एखाद्या प्रसंगाने माणसाचे जीवनच बदलून जाते व उंच यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचता येते हे पटवून दिले कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी !विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी व त्यासाठी करावयाचे नियोजन आणि परीक्षेला समोर जाण्यासाठी महत्त्वाचे टिप्स देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ११ वी च्या विद्यार्थीनी तन्वी फाये व त्रिशाली भुजाडे यांनी सुरेखरित्या केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधि अनुराग मालोदे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. प्रफुल जांभुळे, प्रा. शुभम , प्रा. तुषार बुचे , प्रा. हर्षित उपाध्याय , राखी खेडकर , अमृता देवतळे , प्रियंका शेंद्रे तसेच शाळेतील सर्व प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वर्ग ११ वी च्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले .