Home Breaking News बल्लारपूर दुर्घटनेतील जखमींची आ .किशोर जोरगेवारांनी रुग्णालयात जावून घेतली भेट ! ...

बल्लारपूर दुर्घटनेतील जखमींची आ .किशोर जोरगेवारांनी रुग्णालयात जावून घेतली भेट ! घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी !

131

■ बल्लारपूर दुर्घटनेतील जखमींची आ .किशोर जोरगेवारांनी रुग्णालयात जावून घेतली भेट !

■ घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

बल्लारपुर:बल्लारपुर रेल्वे स्थानक येथे घडलेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची रुग्णालयात जाऊन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज भेट घेतली. उपचारा दरम्यान सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना त्यांनी येथील वैद्यकीय अधिका-यांना केल्या आहे. सदरहु घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी आमदार जोरगेवार यांनी केली आहे.
जखमींच्या भेटी दरम्यान यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, युवा नेते अमोल शेंडे, राशेद हुसेन, रुपेश पांडे, नकुल वासमवार, हेरमन जोसेफ, रुपेश कुंदोजवार, सदनाम मिरधा, दिनेश इंगळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या आरोग्य सेवा पथकाच्या सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने १३ प्रवासी जखमी झाल्याची घटना काल बल्लारपूर रेल्वे स्थानकावर घडली. जखमींपैकी ४५ वर्षीय निलीमा रंगारी या महिलेचा मृत्यु झाला आहे. दरम्यान आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार जोरगेवार यांनी सदरहु जखमींवर उपचार सुरु असलेल्या खाजगी रुग्णालयात जात जखमींची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्या प्रकृतीबाबत आमदार जोरगेवार यांनी रुग्णालय प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली आहे. जखमींच्या नातेवाईकांशीही आमदार जोरगेवार यांनी चर्चा करत घटनेबाबत माहिती जाणून घेतली आहे.
सदर पादचारी पुल हा ४० वर्ष जुना होता. त्याची योग्य देखभाल केल्या गेली नाही. सदरहु पुलाबाबत तक्रारी प्राप्त होऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. ही मोठी चुक असुन याची चौकशी करत दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी रेल्वे विभागाला केली आहे. अपघातात मृत्यु झालेल्या महिलेसह जखमींना शासनस्तरावरुन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. रेल्वे विभागानेही या प्रकरणाकडे गांर्भियाने लक्ष देत जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांची तपासणी करावी, यासाठी एक पथक रेल्वे विभागाने तयार करावे अशी मागणीही आमदार जोरगेवार यांनी केली असुन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आलेल्या तक्रारींकडे दूर्लक्ष करु नका अशा सुचना आमदार जोरगेवार यांनी केल्या आहे.