संग्रामपुर : तालुक्यातील टाकळेश्वर येथील संजय अजाबराव मोरखडे यांच्या मालकीचे टाकळेश्वर शिवारात ११ एककर शेत आहे त्यात पुर्वी ३ एकरात पेरणी केलेल्या क्षेत्रात कपाशी पिक बहरले मात्र ११ पैकी ८ एकरात ९ जुलै रोजी कपाशी पिकाची पेरणी केली रायायणीक खत निंदण , रासायणीक फवारणी करुनही वातारणाच्या बदलामुळे कपाशी पिकावर रोग असल्याने परिणामी कपाशीची वाढ खुटल्याने नैराश्य पोटी हतबल शेतकरी यांनी ८ एकर शेतातील कपाशीच्या उभ्या पिकात रोट्यावेटर फिरविले पिकाला एकरी १५ हजार रुपये खर्च मात्र लावलेला खर्च वायफळ त्यात या वर्षी शासनाने जाहिर केलेल्या कर्ज माफी यादीत नाव नसल्याने कर्ज माफी पासुन वंचीत राहिले पुर्वीच शेतावर जिल्हा सहकारी बॅकचे पिक कर्ज ७० हजार त्यामुळे कसे तरी संबंधीत शेतकरी शेतात उसनवार करुन कपाशीचा पेरा केला सुरवात पासुन निंदन डवरे , कपाशी पिक वाढीसाठी रासायनिक खत फवारणी केली मात्र सदर पिकावर रोगाचा प्रार्दुभाव वाढल्याने वाढ खुटल्याने उत्पादनाची अपेक्षा भंग झाल्याने नैराश्य पोटी शेतकरी संजय मोरखडे यांनी ८ एकरातील कपाशीच्या उभ्या पिकात नैराश्य पोटी रोट्यावेटर फिरविले कृषि महसुल विभागाने सर्वे करुन शासनाने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे