Ballarpur@ city news
● बल्लारपुरातील “त्या” समाज भवनांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा !
●वंचित बहुजन आघाडीची मागणी
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
बल्लारपुर:चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक बल्हारपूर नगरीतील उभारण्यात आलेल्या समाज भवनांचा उपयोग समाज हिताच्या दृष्टीकोनातून व्हावा अशी मागणी बल्हारपूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नुकतीच करण्यात आलेली आहे.
शहरातील सदरहु भवनांचा वापर सध्या स्थितीत शासन आदेशानुसार समाजाच्या हितासाठी होताना दिसून येत नसल्याचे दिलेल्या एका निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कन्नमवार वार्ड , गोकुल नगर वार्ड, साईबाबा वार्ड डॉ.आंबेडकर वार्ड आदीं ठिकाणच्या समाजभवनांचा गैरवापर होत आहे.
तयार झालेल्या समाज भवनांची रंगरंगोटी करुन त्याचा उपयोग समाजहितासाठी उपयोगी येईल या दृष्टीने प्रयत्न करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने करीत बल्हारपूरचे तहसीलदार सतिश साळवे व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले.
या वेळी आघाडीचे शहर महासचिव उमेश कडू ,ओम रायपूरे, विश्वास देशभ्रतार, नम्रता साव ,रिमा पुणेकर, ज्योति पाटील,छाया वेले,छाया निमसटकर, स्मिता ढेंगळे,योगिता अलोणे ,प्रसाद चव्हाण,परमानंद भडके ,प्रकाश तावाडे ,बबन गाणार ,रमेश लिंगपल्लीवार,निलेश जिवने आदीं उपस्थित पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.