Home Breaking News chandrapur @city news • चंद्रपूरचे आ.किशोर जोरगेवार यांनी बैलबंडी चालवित केले शंकरपटाचे...

chandrapur @city news • चंद्रपूरचे आ.किशोर जोरगेवार यांनी बैलबंडी चालवित केले शंकरपटाचे उद्घाटन.. ! •पिपरी येथे भव्य शंकरपटाचे आयोजन..!

463

chandrapur @city news
• चंद्रपूरचे आ.किशोर जोरगेवार यांनी बैलबंडी चालवित केले शंकरपटाचे उद्घाटन.. !

•पिपरी येथे भव्य शंकरपटाचे आयोजन..!

सुवर्ण भारत: किरण घाटे(सह संपादक)

चंद्रपुर:पिपरी येथील गावकऱी मंडळींच्या वतीने आयोजित शंकरपटाचे उद्घाटन चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज बैलबंडी चालवून केले. या उद्घाटन कार्यक्रमाला शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधारकर अडबाले, पिपरीच्या संरपच वैशाली मातणे, उपसरपंच हरीओम पोटवडे, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शाहा, विठ्ठल पिंपळकर, रंगराव पाटील, चंदु मातणे ग्रामपंचायत सदस्य ज्योती पिंपळकर, वर्षा निब्रड, सुनिता मत्ते, माया मुसळे आदींची उपस्थिती लाभली होती.

गावकऱ्यांच्या वतीने पिपरीला शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. शंकरपटासाठी जिल्ह्याभरातील शेतकरी आपल्या बैलबंडीसह सहभागी झाले होते. येथे शंकरपटाचे दुस-यांदा आयोजन करण्यात असुन शंकरपट पाहण्यासाठी गावकऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती.

दरम्यान आमदार जोरगेवार आणि शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले. शहरी भागासह ग्रामीण भागाच्या विकासावर आमचा भर आहे. मोठा निधी आपण या भागाच्या विकासासाठी उपलब्ध करुन दिला. या भागातील पाणी प्रश्न सुटावा, गावकऱ्यांच्या शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी धानोरा बॅरेज तयार करण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणार असुन याचा डिपीआर मंजूर झाला आहे. सदरहु विकास कामांसोबतच अलीकडच्या काळात लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या मातीच्या खेळांना पुनर्जीवित करण्यासाठी आपण माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. यात जवळपास ५ हजार खेळाडूंनी सहभाग घेतला.

या महोत्सवात विविध १० ठिकाणी २१ खेळ खेळल्या गेले दरवर्षी आपण आता हे आयोजन करणार असुन पूढच्या वर्षी शंकरपट हा खेळ सुध्दा या क्रीडा महोत्वसात सहभागी व्हावा यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न करावे असे आमदार किशोर जोरगेवार या वेळी आपल्या भाषणातून म्हणाले.

ग्रामीण भागात बैलाच्या मालकांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते. बैलाच्या आक्रमक स्वभावाचा अन्यत्र उपयोग व्हावा, या हेतूने आधी बैलगाडी अस्तित्वात आली. बैलाची मालकी आणि देखभाल करणं हा आजही अभिमानाची गोष्ट मानली जात जाते. असे त्यांनी यावेळी म्हटले. शंकरपट आयोजनामुळे एक प्रकारे गावकऱ्यांत चांगलाच उत्साह संचारल्याचे दिसून आले.