Home Breaking News Ballarpur city @news • ०६ मार्चला सर्वसामान्य महीला व बेरोजगार युवा...

Ballarpur city @news • ०६ मार्चला सर्वसामान्य महीला व बेरोजगार युवा वर्ग तर्फे इवीएम हटवा आक्रोश मोर्चा

116

Ballarpur city @news

• ०६ मार्चला सर्वसामान्य महीला व बेरोजगार युवा वर्ग तर्फे इवीएम हटवा आक्रोश मोर्चा

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

बल्लारपुर : दिनांक ०६ मार्च २०२४ रोजी आम्ही भारताचे लोक द्वारा ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव या भव्य जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून,सदर मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगानुसार एम एस पी देणे, बेरोजगारांना रोजगार देणे, केजी टू पीजी शिक्षण सक्तीचे व मोफत देणे, या व अशा इतर लोक कल्याणकारी मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर मोर्चाचे नेतृत्व बल्लारपूर शहरातील सर्वसामान्य महिला व बेरोजगार युवावर्ग करणार आहेत. नवीन नगर पालिका कार्यालय (काटा गेट) पासून तहसील कार्यालय पर्यंत रैली काळण्यात येणार दिनांक ०६ मार्च २०२४ वेळ सकाळ ११.०० वाजता राहणार असूंन सदर मोर्चास विविध सामाजिक संघटने कडून पाठिंबा दर्शविण्यात आलेला आहे. करिता ०६ मार्चला होणाऱ्या जन आक्रोश मोर्चा बल्लारपूर शहरातील समस्त महिला,पुरुष,युवा वर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिक संघटनांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकाद्वारे करण्यात आलेले आहे.