Home Breaking News मरेगांव येथील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त; सामान्य कामगार सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष...

मरेगांव येथील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त; सामान्य कामगार सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थंनी दोनदा तक्रार  दिल्यानंतरही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ  करते चौकशी करण्यास टाळाटाळ? 

213

• मरेगांव येथील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त; सामान्य कामगार सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थंनी दोनदा तक्रार  दिल्यानंतरही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ  करते चौकशी करण्यास टाळाटाळ?

 

सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)

 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील मरेगांव येथील जी.आर.क्रिष्णा फेरो ॲलाय कंपनी बाबत एकदा नव्हे तर दोनदा चंद्रपूर नियंत्रण मंडळाकडे प्रत्यक्षात शिष्टमंडळासह जावून लेखी तक्रार सादर केल्यानंतरही या बाबतीत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी चौकशी करण्यासाठी टाळाटाळ का करीत आहे असा सवाल सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी आज उपस्थित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उपरोक्त कंपनी या ठिकाणी विटा तयार करण्याचे काम करीत असून विटासाठी वापरण्यात येणाऱ्या राखेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषणाचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे.तक्रारी सादर केल्यानंतरही या कडे महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे अधिकारी जातीने लक्ष पुरवित नसल्याचा आरोप समर्थ यांनी केला आहे.दरम्यान त्यांनी या बाबतीत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्या कडे एक लेखी तक्रार सादर केली असल्याचे त्यांनी सांगितले .आपण या बाबतीत लवकरच महसूल आयुक्त नागपूर यांच्या कडे या बाबतीत तक्रार सादर करणार असल्याचे ते म्हणाले.