Home Breaking News मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांच्या सोबत हे 13 आमदार आहेत नॉट रिचेबल,...

मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांच्या सोबत हे 13 आमदार आहेत नॉट रिचेबल, ठाकरे सरकार धोक्यात?

94

मुंबई -एकनाश शिंदेंचा पत्ता गुजरातमध्ये सापडला तसा त्यांच्यासोबत नॉट रिचेबल झालेल्या आमदारांचाही ठावठिकाणा हळू हळू लागतोय. आज महाराष्ट्रात नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची मोठी यादी तयार झाली आहे. मात्र यापैकी एकनाथ शिंदेंसोबत कोण कोण आहेत, ते पुढच्या काही तासात उघड होईल. महाराष्ट्रातून 13 आमदार नॉट रिचेबल आहेत

हे आहेत ते आमदार

1. शहाजी बापू पाटील

2. महेश शिंदे सातारा

3. भरत गोगावले

4. महेंद्र दळवी

5. महेश थोरवे

6. विश्वनाथ भोईर

7. संजय राठोड़

8. संदीपान भुमरे

9. उदयसिंह राजपूत

10. संजय शिरसाठ

11. रमेश बोरणारे

12. प्रदीप जैस्वाल

13. अब्दुल सत्तार

मुंबईः सोमवारी एकिकडे विधानभवनात विधान परिषदेचा (MLC Election) निकाल लागत होता आणि तिकडे महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या सरकारच्या पायाखालची जमीन हादरत होती. अखेर निकाल लागला आणि ज्याची शक्यता वाटत होती, तेच घडू लागलं. शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकाएकी नॉट रिचेबल झाले. काही वेळानं कळलं की त्यांच्यासोबत 13 शिवसेना आमदारही (ShivSena MLA) गायब आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले एकनाथ शिंदे गुजरात राज्यात सूरतमध्ये गेल्याची माहिती उघड झाली असून ते सूरतमध्ये नेमकं काय करतायत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकिकडे विधान परिषदेत भाजपचं संख्याबळ वाढल्याने शिवसेनेची धाकधूक वाढू लागली तर भाजपलाही सरकारला अस्थिर करण्यासाठीचं शस्त्र मिळालं. त्यामुळे गुजरातमधील भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सध्या हॉटेल ली मेरिडियन येथे मुक्कामी असून सोमवारी रात्रीपासूनच भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदेंनी 13 आमदारांसह बंड पुकारलं तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास वेळ लागणार नाही, या भीतीनं महराष्ट्रात चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा सध्या गुजरातच्या दिशेनं खिळल्या आहेत.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणण्याची खलबतं जिथं सुरू आहेत, त्या सूरतमधील हॉटेल ली मेरिडियन इथं पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकिकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सोमवारी रात्रीपासून सुरु आहे, तसं सूरतमध्ये या हॉटेलमध्ये हालचालींना वेग आलाय. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुजरात सरकारतर्फे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.