Chandrapur @dist news
• डॉ.गिरीधर काळे प्रतिष्ठानचे पुरस्कार घोषित
• पुरस्कारात सुपरिचित डॉ.मंदाकिनी आमटे, डॉ.प्रकाश आमटे व अर्चना मानलवार-भोयर यांचा समावेश !
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)
चंद्रपूर: विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील
कोरपना तालुक्यातील सुपरिचित समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबीच्या वतीने नामांकित पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे. राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा हा जीवनगौरव पुरस्कार हेमलकसा येथील जागतिक किर्तीचे समाजसेवक पद्मश्री डॉ.मंदाकिनी व डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना जाहीर झाला असुन सेवार्थ सन्मान पुरस्कार चंद्रपूर येथील ज्ञानार्चना संस्थेमार्फत अपंग कल्याणासाठी कार्यरत असणा-या अर्चना मानलवार-भोयर यांना घोषित झालेला आहे.
बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे हे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्णांवर गेल्या ३५ वर्षे निशुल्क उपचार करीत असून आता पावेतो त्यांनी पाच लाखांहून अधिक अस्थिरुग्नांना ठणठणीत केले आहेत. ग्रामसभेने त्यांना ‘डाॅक्टर’ ही ऐतिहासिक उपाधी या पूर्वीच बहाल केली आहे त्यांच्या निस्वार्थी सेवेच्या सन्मानार्थ सदरहु पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात.
स्व.सदाशिवराव चटप स्मृती प्रित्यर्थ माजी आमदार व शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप , प्राचार्य डॉ.अनिल मुसळे यांच्या कडून हे पुरस्कार प्रदान करण्यात येते. रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगिता असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड सारख्या अतिदुर्गम, नक्षलप्रभावित भागात डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातुन आदिम माडिया-गोंड समाजासाठी आरोग्य व शिक्षणाचे काम नित्य करीत आहे. मागील पाच दशकातील त्यांच्या लोकसेवेने जगात आदर्श निर्माण केला.
थोर समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांच्या सेवेचा वारसा त्यांची तिसरी पिढी
चालवित असून कल्याणकारी समाज निर्मितीचे आमटे कुटुंब दिपस्तंभ आहेत. चंद्रपूरच्या समाजसेविका अर्चना मानलवार-भोयर ह्या स्वत: ९०% अपंग आहेत. ज्ञानार्चना संस्थेच्या माध्यमातून त्या अपंगाचे पुनर्वसन करतात. अपंग महिला-पुरुषांना प्रशिक्षण देवून स्वावलंबी बनवण्याचे धडे देत सक्षम करण्याचे काम त्या निष्ठेने व प्रामाणिक पणे करीत आहे.
२०१२ पासून बिबी येथे दिवाळी ही ग्रामस्वच्छता, फटाकेमुक्त व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरी होते.
यंदाचा दिव्यग्राम महोत्सव दि. ७ नोव्हेंबरला बिबी येथे आयोजित केला असून शेतकरी नेते व माजी आमदार ॲड.वामनराव चटप, डॉ.अनिल मुसळे, डॉ.गिरीधर काळे, सविता काळे, स्वागताध्यक्ष संतोष उपरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे रत्नाकर चटप, अविनाश पोईनकर, ॲड.दीपक चटप, गणपत तुम्हाणे, विठ्ठल अहिरकर, संदिप पिंगे, हबीब शेख, सतिश पाचभाई, स्वप्निल झुरमुरे, राजेश खनके, प्रमोद विरुटकर, राकेश बोबडे, कार्तिक मोरे, निलेश झुरमुरे, सुरेंद्र मुसळे, शुभम डाखरे, सुरज लेडांगे, देवानंद पिंपळकर, सचिन आसूटकर, राजेंद्र सलाम, महेश नाकाडे, इराणा तुम्हाणे, विशाल अहिरकर, संतोष बावणे, अनिल हिंगाणे, आकाश चटपल्लीवार, चंपत तुम्हाणे, गोपाल मडावी, आकाश उरकुडे, गणपत मडकाम, सुरज मडावी, महेश राठोड यांनी एका संयुक्तिक पत्रकातून कळविले आहे.