Chandrapur city@ news
■ महागाई व बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनजागर यात्रा !
■ येत्या १५फेब्रुवारीला भद्रावती नगरीत आगमन!
■ महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहावे- किरण साळवींचे आवाहन !
सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : वाढती महागाई व बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हाती घेतलेल्या दुसऱ्या टप्प्यातील पर्वाला नुकतीच सुरुवात झाली असुन या निमित्ताने विदर्भातील नागपूर ,गोंदिया ,वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात या जनजागर यात्रेचे आगमन होत आहे. दुस-या टप्प्यातील पर्वाला उपराजधानी नागपूरातून सुरुवात झाली आहे.दरम्यान ही जनजागर यात्रा येत्या १५फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक भद्रावती नगरीत दुपारी १२:३० वाजता शहराच्या स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहचत असल्याचे भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष किरण साळवी यांनी काल शनिवारी भद्रावती मुक्कामी एका भेटीत या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, राज्य निरीक्षक डॉ.आशाताई मिरगे , राज्य समन्वयक सुरेखा ठाकरे,नागपूर विभागीय महिला अध्यक्ष शाहीन हकीम, व अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या जनजागर यात्रेला आरंभ झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात येणा-या या यात्रेत चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
अन्याय विरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किरण साळवी यांनी केले आहे.
दरम्यान भद्रावती येथे येत असलेल्या जनजागर यात्रेत भद्रावती तालुक्यातील भद्रावती घोडपेठ,पिपरी ,चिरादेवी ,गौराळा, मानोरा ,पिपरबोडी,घोनाड, सुमठाना ,चंदनखेडा ,मांगली आदीं गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे किरण साळवी यांनी सांगितले.