Chandrapur dist@ news
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चंद्रपूर जिल्ह्यात जनजागर यात्रा आरंभ !
सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधी
चंद्रपुर:महाराष्ट्र प्रदेश महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देशातील वाढती महागाई, अत्याचार,बेरोजगारी आदीं विषयांवर “जनजागर-यात्रा” यात्रा सुरू झाली आहे.सदरहु यात्रेच्या माध्यमातून मोदी-शिंदे सरकारच्या विरोधात जनतेत जनजागरण करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील स्थानिक नगरपरिषद चौकात आज सभा घेण्यात आली. या सभेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वर्षाताई निकम(अमरावती)शहीन हकीम, डॉ. सूरेखाताई देशमुख,जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महीला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके,ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे,युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर,राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा पाटील,बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल उराडे,महीला विधानसभा अध्यक्ष शुभांगी साठे,बल्लारपूर शहर महीला अध्यक्ष मल्लेश्र्वरी महेशकर,तालुका अध्यक्ष जिवनकला आलाम,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे,जिल्हा सरचिटणीस बब्बुभाई ईसा,जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया नितीन पिंपळशेंडे माया सातपुते कुणाल (ठेंगरे,निखिल दुर्योधन,सरस्वती गावंडे,अमर धोंगडे,आरीफभाई खान,अमर रहीकवार,अजित पाडवेकर तद्वतच महीला व बल्लारपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.या प्रसंगी हिराचंद बोरकुटे,राजेंद्र वैद्य,राकेश सोमाणी,शुभांगी साठे, डॉ.सुरेखा देशमुख आणि बेबीताई उईके यांनी सभेला मोलाचे मार्गदर्शन केले.