Ghugus city @news
• घुग्घुस शहरातील रोज रात्री बत्ती गुल
✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस:घुग्घुस येथील हैराण झालेल्या नागरिकांना रोज रात्री विजेचा लपंडावाने अधिकच बेहाल करुन सोडले आहे.रात्री डासांचा उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले.रोज रात्री बाराला वीजपुरवठा खंडित होतो,तर मध्यरात्रीनंतर अडीचला येते.अशाप्रकारे सध्या विजेचा लपंडाव सुरु आहे.दररोज डिंम (०) विज घराची राहत आहे.
कार्यालयातील दूरध्वनी व्यस्त, अधिकारी मस्तनागरिक विजेबाबत विचारपूस करण्यासाठी घुग्घुस महावितरणच्या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क करतात. मात्र, दूरध्वनी व्यस्तच असतो. रात्रीचे कर्मचारी जाणून बुजून दूरध्वनी बाजूला उचलून ठेऊन देत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
गावचे नेते फक्त स्वतासाठी राजकारण करत आहे,दिवसभर राजकारण रात्री कोमात राहते,असे घुग्घुस शहरातील नागरिक वारंमवार चर्चेचे भाग बनले आहे,इलेक्शन ओठांवर आले तर विज माफ करा,विज बिल कमी करा,विज बिल मुक्त कर अशाप्रकारे राजकीय नेते आंदोलन करण्यात येते,नागरिकाचे आश्वासनच बनवुन गावचे नेते खोट्या बोम्मा मारतात. नागरिक त्रस्त गावचे नेते मस्त असेपण नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.