Chandrapur city@ news
• अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरातील साहित्यांचे नुकसान!
• चंद्रपूर जलनगर मधील महिला व तरुणी धडकल्या तहसिल कार्यालयात !
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर:गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील व चंद्रपूर शहरातील अनेक घरांचे नुकसान झाले असून सोबतच काही खोलगट भागातील घरात पावसाचे पाणी शिरल्याने ब-याच जणांच्या घरातील अन्नधान्य व अन्य साहित्यांचे नुकसान झाले आहे.शासनस्तरावरुन या बाबतीत सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असल्याचे कळते. आज गुरुवारी शहरातील अनेक महिला व तरुणींनी थेट चंद्रपूर तहसिल कार्यालय गाठून या नुकसानी बाबत एक संयुक्तिकरित्या निवेदन सादर केले. दरम्यान या निवेदनाची एक प्रत चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केल्याचे वृत्त आहे.आज निवेदन देताना जलनगर वार्डातील प्रामुख्याने ज्योति उंदिरवाडे ,संगिता उराडे , तृप्ती उराडे, किरण खैरकार ,शोभा नरवाडे ,शोभा नरवाडे, शबाना शेख , फातिमा शेख, शुभांगी काकडे ,संगिता गोवर्धन, सविता भोयर, आशा उराडे,वर्षा काकडे,छाया चौधरी, सुचित्रा खोब्रागडे, पुष्पा सोनटक्के,जुबेदा शेख , गुलनाज बानो आदिं उपस्थित होत्या.