Bhadrawati taluka: news
• मणिपुर हिंसाचार विरोधात चंद्रपुरात आक्रोश मोर्चा
चंद्रपुर (तुकूम) येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना विरोधात जन आक्रोश मोर्चात महिला आक्रमक.. आरोपी ला फाशी द्या
✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती/चंद्रपुर : मणिपुर मध्ये महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून बलात्कार आणि हत्या करण्यात आली.त्या बाबतीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी अजूनही मणिपुर महिला कांड प्रकरणी आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही. प्रधानमंत्री जग फिरत आहेत आणि मणिपुर ला गेले नाहीत.मणिपुर चे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही. भाजपाने देशात भितीचे वातावरण निर्माण केले आहे. संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार किती असंवेदनशील आहे अशी टिका आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या डाॅ.अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केली.
चंद्रपुरातील दुर्गापुर पोलिस स्टेशन हद्दीतील एका दारू च्या दुकानातील शौचालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेल्या बॅनर लावून बाबासाहेबांची अवमान केल्याची घटना उजेडात आली. देशाला संविधान देणा-या महामानवाची अशी अवमानना निंदनीय असून या घटनेचा निषेध भिम आर्मी चे जिल्हा अध्यक्ष सुरेन्द्र रायपुरे यांनी जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव मा.निलेश ठाकरे यांनी तात्काळ केंद्र सरकार ने मणिपुर येथील राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली.
जन आक्रोश मोर्चा महानगरपालिका मैदानातून जटपुरा गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.चंद्रपुर जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी मोर्चात सहभागी होऊन मणिणुर हिंसाचार प्रकरणी निषेध नोंदवला.
