Ghugus city@ news
• काँग्रेसच्या हल्लाबोल नंतर पंधरा दिवसापासून बंद असलेले शास्त्री नगर येथील नळ सुरू
• वेकोली सब – एरिया अधिकाऱ्यांनी घेतली तातळीची दखल
✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घूस : वेकोलीच्या शास्त्री नगर कॉलोनीत गेल्या पंधरा दिवसापासून नळ बंद असल्याने पिण्याच्या पाण्यापासून परिसरातील नागरिकांना वंचित राहावे लागत आहे.
पाणी ही मूलभूत गरज असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच सहा – सहा तास वीज बंद होत असल्याने ही नागरिकांना प्रचंड जीवघेणा त्रास भोगावा लागत आहे.
नागरिकांना होनाऱ्या त्रासाची माहिती तेथील परिसरातील नागरिकांनी दिली असता काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांना दिली असता रेड्डी यांनी परिसरातील शेकडो महिला – पुरुषांना सोबत घेऊन वेकोलीच्या सब एरिया कार्यालयात हल्लाबोल केला त्याठिकाणी ठिय्या मांडला असता वेकोलीचे नवनियुक्त सब – एरिया सुधाकर रेड्डी यांनी तातळीने नळ समस्या दूर करण्याचे व इतर समस्यां सोडविण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांनी वेकोली कार्यालय सोडले सब एरिया अधिकाऱ्याने ही आपल्या वाचनाची पूर्तता करीत आजच नळ सुरू केल्याने नागरिकांत प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले आहेत.
नागरिकांनी रेड्डी यांचे आभार मानले आहेत.
आजच्या ठिय्या आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर,सुधाकर बांदूरकर,अलिम शेख,रोशन दंतलवार,रोहित डाकूर, साहिल सैय्यद रफिक शेख,देव भंडारी, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.