Ballarpur taluka@ news
•अखेर बल्लारपूर शिवसेनेच्या पदाधिका-यांच्या प्रयत्नाला आले यश!
•विसापूर टोल नाका अधिकाऱ्यावर केली कारवाई !
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर :- चंद्रपूरहून परत येत असताना शिक्षिका वीणावती भीमराव जीवने ह्या बल्लारपूर तहसिलच्या विसापूर टोलनाक्यावर दि.4 एप्रिल रोजी रात्री 7 वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात मृत्यू पावल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे गट संदीप गि-हे यांच्या नेतृत्वाखाली व उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव यांच्या पुढाकाराने विसापूर टोलनाक्यावर मृतांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने आंदोलन करण्यात आले .या वेळी वाहतूक ठप्प करण्यात आली.प्रशासनाने रस्ता रोको हटवून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
शिवसेनेने केलेल्या प्रयत्नामुळे अखेर टोल नाका प्रशासक दिलीप पंढरीनाथ कंचर्लावार वय 48 वर्षे, रा.शिवाजी वॉर्ड बल्लारपूर यांच्यावर 41(1)अ कलम 304 व 283 अन्वये कारवाई करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पना गोरघाटे, तालुका समन्वयक प्रदीप गेडाम, तालुकाप्रमुख प्रकाश पाठक, शहरप्रमुख बाबा शाहू, युसूफ शेख, माजी नगरसेवक प्रभाकर मुरकुटे, तालुका संघटक डॉ. मीनाक्षी गलघाट, युवा नेते प्रशांत गडाला यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.