Home Breaking News Ballarpur city @news •गोल पुलाचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी: भाजपा

Ballarpur city @news •गोल पुलाचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी: भाजपा

33

Ballarpur city @news
•गोल पुलाचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी: भाजपा

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर :- वस्ती विभाग व टेकडी विभागाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा गोल पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रशासन चे लक्ष वेध करण्याकरिता स्थानिक भाजपा ने पत्रकार परिषद चे आयोजन केले होते.
बल्लारपूर शहरातील वस्ती विभाग व डब्ल्यूसीएल बल्लारपूर शहरातील निम्मी लोकसंख्या परिसरात राहते. वस्ती विभाग व ​​शहराला जोडणारा गोल पुल एकमेव मार्ग असून नागरिकांना तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, बसस्थानक, बाजारपेठ, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा कार्यालय, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन आदी कामांसाठी पुलाचा खालून या लागते. मात्र रेल्वेच्या विस्तारीकरणाच्या कामांमुळे हा मार्ग वारंवार ठप्प होत आहे. पाच मिनिटाचा पावसात हा मार्ग बंद होतो. या समस्येमुळे प्रशासनाला वारंवार तोंडी कळवूनही प्रशासन या समस्येवर तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्यात पावसामुळे हा मार्ग सातत्याने बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य समजून प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. जेणेकरून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांपासून दिलासा मिळू शकेल. अन्यथा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाला घटनात्मक आधारावर प्रशासनाच्या विरोधात मैदानात उतरावे लागेल. आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असे पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या वेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण हरीश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. वैशाली जोशी, ज्येष्ठ नेते निलेश खरबडे, महासचिव मनिष पांडे,युवा नेते आशिष देवतळे उपस्थित होते.