Chandrapur city@ News
• रामाळा तलावातील पाण्यामुळे होतेय पूर परिस्थिती निर्माण ,पक्का नाला न बनविल्यास आंदोलनाचा इशारा – आपचा इशारा
चंद्रपूर :किरण घाटे
रामाळा तलावाच्या पाण्याच्या पातळीतील वाढीमुळे, बगड खिडकीच्या मागे वाहणाऱ्या नाल्याचे पाणी वार्डात शिरुन पूर परिस्थिती निर्माण होतेय आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून पक्का नाला बनवण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने अनेक वेळा महानगर पालिका आयुक्तांकडे करण्यात आली, परंतु आजपर्यंत या बाबतीत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
आज आम आदमी पार्टीच्या एका शिष्टमंडळाने परत एकदा आयुक्तांना निवेदन देऊन सदरहु मागणी केली.
उपरोक्त समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर जन आंदोलन करण्याचा इशारा आप पार्टी तर्फे देण्यात आला आहे.
या वेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम आदमी पार्टीच्या महिला महानगराध्यक्ष तब्बसूम शेख या बाबत म्हणाल्या कि “रामाळा तलावामुळे होणारी पूर परिस्थिती नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने तातडीने पक्का नाला बांधण्याची कारवाई करावी,अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सतत लडत राहू.”