Ghadchiroli @ jilha news
भारत जोडो यात्रेत गडचिरोलीच्या सामाजिक कार्यकर्त्या कुसुम ताई अलाम सहभागी !
सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
गडचिरोली:खासदार राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू असुन या पद यात्रेत सामाजिक कार्यकर्ते, लेखक, विचारवंत पुरस्कार प्राप्त कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीं सहभागी झालेली आहे.
दरम्यान विदर्भातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या सुपरिचित आदिवासी सेवक,सामाजिक कार्यकर्त्या ,साहित्यिक, अभ्यासक व पुरस्कार प्राप्त असलेल्या कुसुम ताई अलाम यांनी ही या यात्रेत आपला भाग घेतला होता.कन्या कुमारी ते काश्मीर पर्यंत त्यांच्या सोबत असणारी रत्ना पैकरा व धनलक्ष्मी या पदयात्रीं सोबत १२ किमी अंतर त्यांनी पार केले.ही पदयात्रा महाराष्ट्रातील देगलूर पासुन सुरु झाली.
कुसुम अलाम यांनी म्हटलेली एक कविता ऐकून राहुल गांधी यांनी त्यांचे कवितेला चांगलीच दाद दिली.या वेळी रान जखमांचे गोंदण कविता संग्रह त्यांना भेट देण्यात आला.सोबतच खा.राहुल गांधी यांना निवेदन सादर करण्यात आले त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मागण्यांचा समावेश होता.असे कुसुम ताई अलाम यांनी सांगितले.