Home Breaking News Chandrapur@ city news कलावंतांना प्रोत्साहन देणारा सहजं सुचलं गृप- रंजना दिलीप...

Chandrapur@ city news कलावंतांना प्रोत्साहन देणारा सहजं सुचलं गृप- रंजना दिलीप मोडक मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांचे योगदान मोलाचे! अनेक सदस्यांचा गृप मध्ये समावेश !

174

Chandrapur@ city news

■कलावंतांना प्रोत्साहन देणारा सहजं सुचलं गृप- रंजना दिलीप मोडक

■मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांचे योगदान मोलाचे!

■अनेक सदस्यांचा गृप मध्ये समावेश !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:नवोदित साहित्यिकांना तसेच महिला व तरुणींच्या कला गुणांना सोबतच त्यांचे सुप्त गुणांना वाव देणारा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं हा एकमेव व्हाॅटसअप गृप असल्याचे मनोगत चंद्रपूर जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेल्या सुपरिचित सामाजिक कार्यकर्त्या रंजना दिलीप मोडक यांनी आज बुधवारी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

या गृप वर निव्वळ चंद्रपूर गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यातीलच महिला व तरुणीं नाही तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत महिला साहित्यिक, मेकअप आर्टिस्ट, शैक्षणिक, सामाजिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणांऱ्या कलावंत व महिला जुळल्या असल्याच्या सामाजिक कार्यकर्त्या रंजना मोडक पुढे म्हणाल्या.

गत आठ वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील वरुड या एका छोट्या गावी वास्तव्य करणारी अभियंता कु. रितू संजय लोहकरे यांचे संकल्पनेतून या गृपची निर्मीती करण्यांत आली. आजच्या घडीला या गृपवर १५००पेक्षा अधिक महिलां व तरुणी ह्या गृपच्या सदस्या झाल्या आहे.

सदरहु गृप अल्प कालावधीत प्रसिध्दीच्या झोतात आला असुन खरोखरचं यातील काही जेष्ठ सदस्या नवोदित तरुणींसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरल्या आहे.सहजं सुचलं महिला गृपच्या मुख्य मार्गदर्शिका उपराजधानी नागपूरच्या मायाताई कोसरे व राजूराच्या जेष्ठ साहित्यिका अधिवक्ता मेघा धोटे ह्या आहेत.

उपरोक्त गृप वरील अनेक नवोदित सदस्यांनी कला ,साहित्य सामाजिक,व शैक्षणिक क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त केले‌ले आहे.विशेषता महाराष्ट्रातील कन्हानच्या कु.कल्याणी सरोदे वणीच्या विजया तत्वादी, रजनी पोयाम क्रीडापटू कु.सायली टोपकर ,पथ्रोडच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे , गडचिरोलीच्या शितल मेश्राम , अधिवक्ता कविता मोहरककर , मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,चिमूरच्या कवयित्री वर्षा शेंडे, सिंदेवाहीच्या भावना खोब्रागडे या शिवाय सामाजिक कार्यकर्त्या नागपूरच्या नयना झाडे ,चंद्रपूरच्या वंदना हातगांवकर , मुग्धा खांडे छबूताई वैरागडे, चंदा वैरागडे, घुग्घुसच्या शारदा झाडे भद्रावतीच्या किरण साळवी , रजनी रनदिवे , संगिता भोयर ,नंदिनी लाहोळे , जयश्री येरमे ,सुविद्या बांबोडे, सिमा पाटील, मुंबईच्या श्रुती उरणकर ,वर्षा आत्राम , मूलच्या वंदना आगरकाठे ,कल्याणी इटनकर, वर्षा कोंगरे , भाग्यश्री हांडे ,संगिता चिताडे, जास्मिन शेख , शारदा मेश्राम, प्रियंका मेश्राम,पुनम पिसे ,सरीना शेख , पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांचेसहअनेक महिला व युवती या गृपच्या सदस्या झाल्या आहेत.

या गृपला येत्या एक जानेवारीला आठ वर्ष पूर्ण होत आहे सहज सुचलं साठी उपराजधानी नागपूरच्या मायाताई कोसरे व मेघा धोटे यांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे रंजना मोडक शेवटी म्हणाल्या .