Chandrapur@ city news
■ रस्त्याचे कामा विषयी सूर्या अडबाले आक्रमक!
■ अधिकाऱ्यांना सुनाविले खडे बोल !
नवरगांवातील रस्त्याचे काम अपूर्णच!
■ नागरिकांत व्यक्त होतोय संताप !
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपुर:चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्या अंतर्गत येत असलेल्या नवरगाव येथे रोजगार हमी योजने अंतर्गत माता चौक ते बस स्थानक या भागात सी सी रोड चे बांधकाम फरवरी २०२२ पासुन सुरु झाले आहे.परंतु २-१२-२०२२ पर्यंत ते काम पुर्ण झाले नाही.
त्यामुळे गावातील नागरिकांसह येथील शाळेकरी विद्यार्थ्यांना ये जा करतांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. या शिवाय रोडचे काम पुर्ण झाले नसल्यामुळे वाहुतकीची मोठी कोंडी होत असल्याचे प्रत्यक्षात दृष्टीक्षेपात पडते . सदरहु रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामूळे तदवतच वाहतुक कोंडी होत असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रस्ता बरोबर नसल्यामुळे एसटी महामंडळाची बस सुध्दा ब-याच दिवसांपासून गावात येत नाही .शाळेकरी मुलांना त्रास तर होतोच सोबतच गावकरी आता त्रस्त झाले असल्याचे एकंदरीत दिसून येते.गामस्थ या कामाबाबत चौकशी करण्यास गेले असता त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागचे अधिकारी तो कॉन्ट्रॅक्टर बाहेरचा आहे एव्हढे उत्तर देवू मोकळे होतात.एव्हढेच नाही तर कधी कधी हेच वरिष्ठ अधिकारी लवकरात लवकर काम सुरु करू! असं म्हणत गेल्या सात आठ महिन्यांपासून गावकऱ्यांची बोळवण करीत आहेत.
स्वाभिमान पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी आज ही परिस्थिती डोळ्यांनी बघताच त्यांनी संबंधित अधिका-यांना खडे बोल सुनावले . दरम्यान उपरोक्त रस्त्याचे बांधकाम अंदाज पत्रकानुसार लवकरात लवकर पूर्ण करावे अशी गावकऱ्यांची मागणी जोर धरु लागली आहे. येत्या १० दिवसात नवरगावातील या मुख्य रस्त्याचे काम पूर्ण नाही झाले तर सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभे करु असा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्या अडबाले यांनी आज प्रशासनाला दिला आहे.