Chandrapur city @ news
■ चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों कोतवाल बांधव भव्य मोर्चात सहभागी होण्यासाठी नागपूरला रवाना!
■ नागपूर विधानसभेवर महाराष्ट्र कोतवाल संघटनेचा धडकणार आज विराट मोर्चा !
सुवर्ण भारत:किरण घाटे (विषेश प्रतिनिधी)
चंद्रपुर:शासन दरबारी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील कोतवाल बांधवांच्या अनेक रास्त मागण्यां प्रलंबित असून या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवार दि. २८डिसेंबरला भव्य मोर्चा विधानसभेवर काढण्याचा निर्धार महाराष्ट्र कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी घेतला आहे.
त्यासाठी अतिदुर्गम चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों कोतवाल बांधव आज सकाळी नागपूरला रवाना झाले आहेत. दरम्यान त्यांनी शुक्रवार दि.२३डिसेंबरला सकाळी ११वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे एक निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात प्रामुख्याने -कोतवाल संवर्गांकरिता चतुर्थ श्रेणी विचारधीन ठेवून सध्या स्थितीत किमान वेतन देण्यात यावे . कोतवाल बांधवांना सरसकट १५००० हजार रुपयें मानधन देण्यात यावे आदीं रास्त मागण्यां निवेदनात नमुद केल्या आहेत.
आजच्या विराट मोर्चात सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मेश्राम, उपाध्यक्ष दयाराम वंजारी,तालुकाध्यक्ष निलेश नांदे,तालुका सचिव संदीप थाटे, कोषाध्यक्ष प्रशांत वाघमारे या शिवाय भोजराज चौधरी ,कुंदन शिंदे, मनोज मडावी, ज्ञानेश्वर वाढई यांचेसह शेकडो कोतवाल बांधव आज नागपूरला जात आहे.