Jivti @taluka news
•जिवतीतील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करण्याची सुदाम राठोड यांची मागणी …!
सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)
चंद्रपुर:चंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करण्यात यावे अश्या मागणीचे एक लेखी निवेदन जिवतीच्या तहसीलदार मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी नुकतेच दिले आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन आज दोन वर्षे पूर्ण झाले. परंतु आतापावेतो जिवती तालुक्यातील पीडित, शोषित,व गरजू रुग्णांना या नविन रुग्णालयाचा फायदा झालेला नाही,मग ही ईमारत ऊभी करून काय कामाची ?असा सवाल देखिल येथील स्थानिक जनतेंनी केला आहे.
शासनाने भरमसाठ निधी खर्च करून सामान्य माणसाच्या हितासाठी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली आहे परंतु शासन आणि प्रशासनला या इमारतीचा विसर पडला की काय?हा प्रश्न आता सर्व सामान्य जनतेला पडला आहे.दरम्यान
जिवतीला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये रुग्णांची आवश्यक ती सोय होत नाही,किरकोळ उपचारासाठी व आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांना गडचांदूर किंवा चंद्रपूरच्या रुग्णालयात पाठविल्या जाते.
तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या प्रकारची रुग्णांना सोय सुविधा असणे आवश्यक आहे, पण असे होतांना या ठिकाणी दिसत नाही. हेच ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास PM करणे ,सोनोग्राफी करणे,आॅपरेशन करणे इत्यादी सोय उपलब्ध होईल असे स्थानिक जनतेला वाटते.
निवेदन देताना सुदाम राठोड ,जयवंत गोतावळे, केशव चव्हाण, सीताराम सोयाम, सूर्यभान कुलसंगे व विराआस सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल राठोड उपस्थित होते.एका महिन्याच्या आत मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखिल सुदाम राठोड यांनी निवेदनातून दिला आहे.