Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नाव...

Ballarpur city@ news • बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नाव समाविष्ट करा -उलगुलान संघटनेंने केली तहसिलदारांकडे मागणी

55

Ballarpur city@ news
• बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नाव समाविष्ट करा -उलगुलान संघटनेंने केली तहसिलदारांकडे मागणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपुर: तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नाव समाविष्ट करा अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीने करण्यात आले असून बल्लारपूर तहसिलदारांना संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात आज मंगळवारी एक निवेदन देण्यात आले.यावेळी अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

बल्लारपूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यास गेल्यास शेतकऱ्यांचे कागदपत्रे बाद करण्यात येत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच सर्वे क्रमांक टाकल्यास शेतकऱ्यांच्या मोबाइल वर एसएमएस येत नसून नॉट रेकॉर्ड असा एसएमएस येत आहे.त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजने पासून वंचित राहत असून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दरम्यान या बाबतची माहिती शेतकऱ्यांनी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांना दिली.त्यांनी लगेच शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता थेट शेतकऱ्यांना सोबत घेत तहसिल कार्यालय गाठत वरील बाबतीत तहसीलदारांना जाब विचारला.त्यानंतर बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नांव प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोल करण्याचा इशारा उलगुलान शेतकरी संघटनेचे राजु झोडे, श्याम झिलपे,रवि वनकर, राजकुमार शर्मा, राजेन्द्र पाल,विठोबा काळबांधे, संजय कुशवाह, महिपाल आर्या,विरु यादव आदींनी या वेळी दिला.