Ballarpur city@ news
• ट्राॅफिक सिग्नल सुरू करा -मनसे शहर प्रमुख उमेश कुंड़ले बल्हारपूर पोलिस प्रशासनाकडे मागणी
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
बल्लारपूर : शहरात अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून तरुण वर्ग वाहने चालवताना नियमांचे पालन करत नसल्याची बाब दिसून येते. वेगाने वाहने चालविणे ,मोठ्यांनी हॉर्न वाजविणे असे प्रकार सध्या तरुणांकडून होत आहे.गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची व्यवस्था करणे आता गरजेचे झाले आहे.जेणे करून त्या मार्गावर कुठलाही अपघात होणार नाही.शहराच्या अनेक मुख्य मार्गावरील रस्त्यावर जनावरे बसलेली असतात.त्यांचा देखील बंदोबस्त होणे तेव्हढेच गरजेचे झालेले आहे .शहरातील वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी तसेच ट्राॅफिक सिग्नल सुरू करावे अशी मागणी बल्लारपूर शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे . निवेदन सादर करतांना विष्णू बुजोने ,उमेश कुंडले, केतन तगरम आदिं उपस्थित होते.