Home Breaking News Rajura taluka@ news • पुरोगामी विचारमंचचा भव्य जनआक्रोश मोर्चा धडकला राजूरा तहसील...

Rajura taluka@ news • पुरोगामी विचारमंचचा भव्य जनआक्रोश मोर्चा धडकला राजूरा तहसील कार्यालयावर!

62

Rajura taluka@ news
• पुरोगामी विचारमंचचा भव्य जनआक्रोश मोर्चा धडकला राजूरा तहसील कार्यालयावर!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

राजुर:पुरोगामी विचारमंच राजुराच्या वतीने आज दि.१८सप्टेंबरला भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .या मोर्चात शहरातील अंदाजे 25 सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग होता.
सदरहु मोर्चा संविधान चौक, नाका नं ३, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालय येथे धडकला .
उपरोक्त आयोजित मोर्चा मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत असतांना या वेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जनविरोधी जीआर स्थानिक गांधी चौक व तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जाळण्यात आला.
महाराष्ट्र सरकारने नुकताच जीआर काढून शासकीय सेवेतील पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब व होतकरू मुलांचे भविष्य दावणीला लागणार आहे. दिवसरात्र अभ्यास करून शासकीय नोकरीला लागण्याचे तरुणांचे स्वप्न आता भंगणार आहे. या निर्णयामुळे आरक्षणा सारख्या संवैधानिक मुद्द्यालाही निकामी करत केवळ कागदावरच ठेवत व सामाजिक सौहार्द बिघडवत राज्यातील तरुणांच्या आयुष्याशी खेळ मांडला आहे. या निर्णयामुळे आरक्षणाला काहीही महत्व उरणार नसून गरिबी व दरिद्रता राज्यातील जनतेच्या नशिबी मारण्याचा डाव राज्यकर्त्यांनी मांडला आहे. तसेच राज्यातील 62 हजार सरकारी शाळा 10 वर्षाकरिता भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या नावावर कॉर्पोरेट क्षेत्रातील खासगी कंपन्यांना दत्तक देऊन छुप्या पद्धतीने शाळांचे खासगिकरण करण्याचा डाव आखून राज्यातील तमाम बहुजन मुलांच्या शिक्षणाच्या घटनादत्त अधिकारावर घाला घालणार आहे.
जर हे जनविरोधी जीआर महाराष्ट्र शासनाने परत घेतले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदना द्वारा देण्यात आला.
मोर्चात युवक-युवती, महिला, शिक्षक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.मोर्चा यशस्वी करण्यासाठी धीरज मेश्राम, दिनेश पारखी,ॲड. मारोती कुरवटकर,अमोल राऊत, संतोष कुळमेथे, रमेश आड़े,संभाजी साळवे,पुंडलिक वाढ़ई होते. तसेच ॲड.डॉ. सत्यपाल कातकर,बलवंत ठाकरे,डॉ. मधुकर कोटनाके,संदिप कोंडेकर,प्रदिप पायघन, फझल भाई, श्रीकृष्ण वडस्कर, किसन बावणे, विजय मोरे, साईनाथ परसुटकर, किरण लांडे, धनंजय बोरडे, सुभाष पावड़े, विजय भोयर, दिलीप गिरसावळे, नंदूभाऊ वाढ़ई, आनंद अंगलवार, दिलीप निमकर, नीलेश पवार, मनोज सदाफळे, संजय बोबाटे, पी. एन. वाढ़ई यांनी अथक परिश्रम घेतले.