Ballarpur city@ news
• बल्लारपुरात छठ सण मोठ्या उत्साहात साजरा
सुवर्ण भारत:शंकर महाकाली
बल्लारपूर :- उत्तर भारत बिहार राज्य आणि उत्तर प्रदेशातील छठ पूजा उत्सव बल्लारपूर – राजुरा मार्गावरील वर्धा नदीच्या घाटावर तसेच वर्धा नदीच्या काठावर स्थानिक भगतसिंग वार्डात असलेल्या छठ घाटावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, जिथे हजारो भाविकांची मोठी गर्दी जमली होती, सर्वांनी मावळत्या सूर्याचे दर्शन घेतले. स्त्रिया अर्घ्य अर्पण करून पूजा केले. सतत छत्तीस तासांचा हा उपवास, पाण्याशिवाय, स्त्रिया मूल होण्यासाठी ठेवतात, त्यात पाणी पिणे देखील निषिद्ध मानले जाते, स्त्रिया नवस पूर्ण झाल्यानंतर ते करतात. हे व्रत आयुष्यभर पाळावे लागतात.घरात सून आल्यावर महिला आपल्या व्रत सुनेला देतात आणि तिला उपवास करायला लावतात, जेणेकरून त्यांची सुटका होईल. घरातील समस्या किंवा रोग होणार नाही.
चौथतिथीला आंघोळ करून दुधी भोपळा ची भाजी, हरभरा डाळ आणि भात खाऊन हा उपवास सुरू होतो. दुसऱ्या दिवशी दिवसभर खर्नात उपवास करून रात्री उसाचा रस, गूळ आणि भाताची खीर खाल्ली जाते. तिसर्या दिवशी संध्याकाळी मावळत्या सूर्याला अर्धांग अर्पण करून, चौथ्या दिवशी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी नदीकाठी जाऊन उगवत्या सूर्यदेवाला पूजा अर्पण करून विधिवत पूजा करावी. घरी जाऊन उपवास सोडातात. महिलांनी पिठाचा ठेगुवा प्रसाद खाऊन उपवास सोडतात.
रविवारी सायंकाळी भगत सिंह वार्डच्या छठ घाट वर महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ चे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपुर नगर परिषद चे माजी नगाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष हरीश शर्मा, शिवचंद्र द्विवेदी, मीना द्विवेदी, सुंचुवार, मुन्ना श्रीवास, रामकृपाल निषाद, हनुमान सिंह, अनिल पांडेय, के एन प्रसाद, रिकू गुप्ता, मनीष रामिला आदि उपस्थित राहून लोकांना शुभेच्या दिले.
