Home Breaking News Chandrapur dist@ news • शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी सोमवारी विधान...

Chandrapur dist@ news • शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी सोमवारी विधान सभेवर विराट मोर्चा ! •मोर्चात सहभागी होण्याचे कॉ. विनोद झोडगे यांचे आवाहन

367

Chandrapur dist@ news
• शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी सोमवारी विधान सभेवर विराट मोर्चा !

•मोर्चात सहभागी होण्याचे कॉ. विनोद झोडगे यांचे आवाहन

चंद्रपूर:किरण घाटे

गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत 1500 रुपये ह्या अल्प व तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व प्राॅयव्हेट शाळे मध्ये दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा प्रपंच भागत भागत नाही.वाढत्या महागाईत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.संघटनेच्या अथक संघर्षातून 9 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णय नुसार शापोआ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एप्रिल महिन्या पासून 1000 रू.मासिक वाढ केलेली आहे .परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने शापोआ कर्मचारी सरकार प्रति आपली तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.कुटुंब चालणे योग्य मानधन वाढ व किमान वेतन लागू करण्यात यावे यासह अन्य रास्त मागण्यांसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी नागपूर विधान सभेवर विराट मोर्चा आयोजित केलेला आहे ,या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक एम एस इ बी वर्कर्स फेडरेशन सभागृहात तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी जिल्हा सचिव कॉ.वनिता कुंठावार,रवींद्र उमाटे, भाकप जिल्हा सचिव कॉ.प्रकाश रेड्डी,ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष कुंदा कोहपरे,जयघोष दिघोरे,राज्य संघटक कॉ.श्रीधर वाढई यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या विषयही चर्चा करण्यात आली ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना किमान 26 हजार रु.वेतन देण्यात यावे,चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी,दर महिन्याला मानधन व इंधन बिल देण्यात यावे कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये,त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये ,सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी,सर्व शाळेत गॅस सिलेंडर , धान्यसाठा व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे,दरवर्षी करारनामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.या शिवाय 12 महिन्यांचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी ,दिवाळी बोनस(भाऊबीज) लागू करण्यात यावी. शापोआ कर्मचाऱ्यांना शाळा व शाळेचा संपूर्ण पटांगण साफ करण्यांस सांगू नये.दर 3 महिन्यांतून जिल्हास्तरावर संघटने सोबत बैठक आयोजित करून स्थानिक समस्यांचा निपटारा करण्यात यावा .यासह विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली.

मानधन वाढ व इतर मागण्यासाठी येत्या 18 डिसेंबरला रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर राज्यव्यापी आक्रोश मोर्चा आयोजित केला असल्याचे कॉ.विनोद झोडगे व काॅ.कुंदा कोहपरे यांनी आज सांगितले.तदवतंच कर्मचा-यांनी मोर्चात मोठ्या संख्येंने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मेळाव्यात तालुक्यातील शेकडों कर्मचारी सहभागी झाले होते.
सदरहु कार्यक्रमाचे संचालन कॉ.जयघोष दिघोरे,प्रास्ताविक श्रीधर वाढई तर उपस्थितीतांचे आभार रवींद्र उमाटे यांनी मानले.