सावित्री ब्रिगेडने केला हिरकण्यांचा सत्कार !
नागपूर :किरण घाटे
अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडने स्त्री शक्ती जागृती मेळावा नागपूरातील स्मृती सभागृहात नुकताच आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रा. ओ. म. महासंघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरयू तायवाडे होत्या तर उद्घटिका म्हणून सभापती महिला व बालकल्याण समिती जि. प. नागपूरच्या अवंतिका लेकुरवाळे उपस्थित होत्या . इरा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका अनिता पांडव, रा. ओ. म. महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष इजि. सुषमा भड, नेताजी सुभाषचंद्र बोसच्या मुख्याध्यापिका दर्शना बावनकुळे, सामाजिक विचारवंत सरीता राणेकर, आयडियल ॲकॅडमी ऑफ सायन्स च्या संचालिका रुपाली जिचकार, सामाजिक कार्यकर्त्या नम्रता देशमुख यांना अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ स्मिता मेहेत्रे यांनी स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केले.तसेच पक्ष्यांचे दाना पात्र भेट देऊन पक्ष्यांप्रती आपल्या कर्तव्याचे स्मरण करून दिले.
प्रास्ताविक भाषणात डॉ. स्मिता निशिकांत मेहेत्रे म्हणाल्या, ” प्रत्येक भगिणीमध्ये काहीतरी वेगळेपण असतं, ते त्यांनी ओळखून त्या दिशेने आपली वाटचाल केली पाहिजे. अवंतिका लेकुरवाळे यांनी आज स्त्रियांनी सक्षम होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. सुषमा भड, अनिता पांडव, संध्या राजूरकर, रुपाली जिचकार, सरीता राणेकर, दर्शना बावनकुळे यांनी महिलांना आत्मनिर्भर होण्याबाबत मार्गदर्शन केले. आमदार विकास ठाकरे यांचा शाॅल, रोपटे देऊन या वेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी महिला मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या २१ हिरकण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात दैनिक बहुजन सौरभच्या संपादिका संध्या राजूरकर , मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजश्री निंबाळकर,
पोलीस कॉन्स्टेबल वैशाली नासरे ,
कोरियोग्राफर अनुष्का ठाकरे,
समुपदेशक मनिषा गुरनूले,
समाजसेविका कविता राजू खानपासोले,
आयुर्वेदाचार्य डॉ. ललिता मोटघरे,
योग शिक्षिका वंदना क्षिरसागर,
फॅशन कोरिओग्राफर अर्चना तडसे, जलतरणपटू नेत्रहीन ईश्वरी पांडे,
फॅशन डिझायनर दिव्यांग मिनाक्षी पाचपोर आदींचा समावेश होता. याप्रसंगी दैनिक बहुजन सौरभच्या संपादिका संध्या राजूरकर यांनी, “भगिणींमधील नेतृत्व,मातृत्व,कर्तृत्व आणि दातृत्व ओळखुन त्यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करणे हे अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडचे कार्य कौतुकास्पद आहे ” असे मत बोलताना व्यक्त केले.
स्पर्धेची सुरवात उज्वला पाटील संचालित विविध रणरागिणींना अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत प्रतिक्षा चव्हाण यांच्या बंजारा नृत्याने प्रथम, नंदा सोनुले यांच्या थोर विचारवंत या नाटकाने द्वितीय, सरीता जयपूरकर यांच्या एकपात्री प्रयोगाने तृतीय, तर वीरा गुरनूले हिच्या नृत्याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. यात उन्नती शंभरकर, प्रणोती कळमकर,प्रियंका सोनुले, डॉ. ऋतूजा गोमासे, डॉ. मिताली कळमकर, सुनंदा जांबुतकर आदींच्या नृत्याने सभागृह हरखून गेले होते. खुमासदार संचलन शितल बनसोड, , नस्वागत गीत प्रियंका सोनुले व समुह, आभार प्रदर्शन निमा बोडखे यांनी केले.ॲड.रोमा खंडवाणी,विद्या सुरकार, प्रणोती कळमकर,संगिता लंगडे, नंदा सोनुले, उज्वला पाटील, मंगला ठाकरे, रेखा हिरूडकर, ज्योती मून, राणी शाह,शोभा येवले, सुनंदा जांबुतकर, वंदना क्षिरसागर, विजया कापसे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ५०० भगिणींची उपस्थित असलेल्या या समारंभाचा सांगता शेवटी स्नेहभोजनाने झाली.
