Mul taluka@ news
•मरेगांव येथील “त्या”कंपनीच्या प्रदुषणाबाबत चौकशी होत नाही तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही – दत्तात्रय समर्थ
सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)
मूल – मूल तालुक्यातील मरेगांव येथील प्रदुषण निर्माण करीत असलेल्या कंपनीची जो पर्यंत सखोल चौकशी होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे दत्तात्रय समर्थ यांनी काल चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.विशेष म्हणजे त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या बाबतीत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.दरम्यान चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मूलच्या तहसिलदार मृदूला मोरे यांना या बाबतीत सविस्तर चौकशी करून अहवाल मागितला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.या अगोदर सुध्दा समर्थ व काही पदाधिका-यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्या कडे याच बाबतीत लेखी तक्रार नोंदवली आहे.