Home Breaking News •”त्या” अत्याचार प्रकरणी आदिवासी टायगर सेना झाली आक्रमक ! •आरोपींना अद्याप अटक...

•”त्या” अत्याचार प्रकरणी आदिवासी टायगर सेना झाली आक्रमक ! •आरोपींना अद्याप अटक नाही!

38

•”त्या” अत्याचार प्रकरणी आदिवासी टायगर सेना झाली आक्रमक !
•आरोपींना अद्याप अटक नाही!

सुवर्ण भारत:किरण घाटे

राजुरा( चंद्रपूर)
किरण घाटे

चंद्रपूर येथील आदिवासी मुलीला जातीवाचक शिवीगाळ,मारझोड,व अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या आरोपींना ४०दिवस लोटूनही अटक न झाल्याने पिडीत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आज शनिवारला आदिवासी टायगर सेनाने चंद्रपूर मुक्कामी पत्रकार परिषद घेतली.या वेळी ती पिडीत मुलगी स्वतः हजर होती.
या घटनेतील आरोपींवर दि.१६/५/२०२४ ला भा.द.वी 354 (A) (1)(i),294,506, 34 सह अनुसूचित जाती_जमाती (अत्याचार प्रतिबंधक) 3(2)(va),3(1)(W) गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु अजूनही आरोपी प्रबोधकुमार जाडाजी,पंकज सिंग व कुमार पाल हे मोकाट असल्याने वारंवार ते फिर्यादी मुलीला धमकी देत आहेत. एव्हढेच नाही तर ते सदरहु प्रकरण मागे घ्या.नाही तर जिवे मारू अशी धमकी सुध्दा देत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी हे वारंवार उडवा उडवीचे उत्तर देत आहे.अशी माहिती फिर्यादीने आदिवासी टायगर सेनाचे ऍड. संतोष कुळमेथे , जितेश कुळमेथे , प्रा. हितेश मडावी , माजी सैनिक ड्रेफुल आत्राम, , प्रियंका मडावी ,रंजीत मडावी, विराज सुरपाम ह्यांना निवेदन देऊन घडलेली आपबीती सांगितली, प्रकरणाची गंभीरता लक्ष्यात घेता आदिवासी टायगर सेनाच्या वतीने चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक, व उप विभागीय पोलिस अधिकारी ह्यांना भेट घेऊन एक निवेदन देण्यात आले. पण पोलिस विभाग मार्फत कुठलीही कारवाई या प्रकरणात करण्यात आली नाही.त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेण्यात आली.फिर्यादी युवतींनी सांगितले की मला व माझ्या परिवाराला काही झाल्यास ह्यांची सर्वस्वी जबाबदारी पोलिस विभागाची राहील. आरोपींना अटक न केल्यास मी पोलिस अधीक्षक कार्यालय समोर आत्मदहन करेल असा इशारा देखील तिने या पत्रकार परिषदेतून दिला आहे.