Home Breaking News Chandrapur dist News •चंद्रपूर जागृती मशाल मंच तर्फे मध्यरात्रीची रॅली कळणार

Chandrapur dist News •चंद्रपूर जागृती मशाल मंच तर्फे मध्यरात्रीची रॅली कळणार

107

Chandrapur dist News
•चंद्रपूर जागृती मशाल मंच तर्फे मध्यरात्रीची रॅली कळणार

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

चंद्रपूर:स्त्री सुरक्षा या विषयावर 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2024 मधील मध्यरात्री चंद्रपूर शहरात गांधी चौक ते प्रियदर्शिनी चौक “मध्यरात्री रॅली “काढण्याचा कळणार
” स्त्री सुरक्षेसाठी घेणार शपथ”

‘चंद्रपूर जागृती मशाल मंच’ चंद्रपूरच्या सामाजिक संस्था, संघटना आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल एक नेटवर्क आहे जे चंद्रपूरमधील महिलांच्या समस्यांवर काम करण्यासाठी समर्पित आहे. या मंचाची संकल्पना १८ ऑगस्ट २०२४ रोजी रविवारच्या पहिल्या बैठकीत आकाराला आली. या बैठकीत महिलां संबंधित विविध गंभीर मुद्द्यांवर चर्चा झाली आणि या समस्यांवर सामूहिक पणे काम करण्याची गरज ओळखण्यात आली. याच ठिकाणाहून या संघटनेची पायाभरणी कऱण्यात आलें.

या संघटनेच्या पहिल्या उपक्रमात दि.३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२४ च्या मध्यरात्री चंद्रपूरच्या गांधी चौकापासून प्रियदर्शिनी चौकापर्यंत मध्यरात्रीची रॅलीचे(Midnight March) आयोजन करण्यात आले आहे.

संध्याकाळी ९.३० वाजता गांधी चौकात एकत्र येऊन रॅली मध्यरात्री प्रियदर्शिनी चौकात पोहोचेल. प्रियदर्शिनी चौकात सर्वजण एकत्र येऊन महिलांच्या सुरक्षेची शपथ घेतील आणि राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करतील.

या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाचे पूर्ण सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक सुदर्शन आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या चळवळीत सहभागी होण्यासाठी मंच सर्व शैक्षणिक संस्थांना, व्यावसायिक संस्थांना, कामगार संघटनांना, सामाजिक आणि सरकारी संस्थांना तसेच जागरूक नागरिकांना आवाहन करीत आहे .

आपण दररोज महिलांविरुद्ध होणाऱ्या छळाच्या बातम्या ऐकतो. छेडछाड असो, पाठलाग असो किंवा बलात्कार असो. या मार्चचे उद्दिष्ट हे आहे की चंद्रपूरच्या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ त्यांच्या कुटुंबाची नसून चंद्रपूरच्या सर्व नागरिकांची आहे. चंद्रपूरमध्ये प्रत्येक मुलगी आपलीच मुलगी आहे, ही भावना या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे.

*रॅलीचे उद्देश:*

1.जागरुकता वाढवणे: एक मजबूत सामुदायिक भावना निर्माण करणे आणि महिलांच्या सुरक्षा आणि हक्कांबद्दल जागरुकता पसरवणे.
2.एकजुटता दाखवणे: चंद्रपूरचे नागरिक महिलांच्या सुरक्षेच्या समर्थनार्थ एकत्र आहेत हे दाखवणे, त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानणे.
3.सुरक्षेला प्रोत्साहनदेणे : संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला, विशेषत: रात्री उशिरा काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटावे याची सार्वजनिक हमी देणे. याव्यतिरिक्त, केवळ विशिष्ट संस्थांचे कर्मचारीच नव्हे तर संपूर्ण समाजाने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी.केवळ कामकाजी महिलाच नाही तर प्रत्येक महिलेला रात्रीच्या वेळी कोणत्याही भीतीशिवाय स्वतंत्रपणे फिरण्याचा अधिकार असला पाहिजे.

या उद्देशांच्या पार्श्वभूमीवर ही मध्यरात्रीची रॅली आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूरचे नागरिक – पुरुष आणि महिला दोघेही सहभागी होतील, तसेच जिल्हा प्रशासनही सहभागी होऊन चंद्रपूरच्या मुलींना आश्वस्त करेल की आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत आणि या शहराच्या रात्री पुरुषांसारख्याच त्यांच्याही आहेत.