#Bhadravti
• कामगारांवर होणारे अन्याय आयटक कधीही खपवून घेणार नाही :- शाम काळे
सुवर्ण भारत:राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती :- या देशात १९४८ ला किमान वेतन योजना लागू झाली. मात्र ७५ वर्ष स्वातंत्र्या प्राप्ती नंतरही देशातील कामगारांना किमान वेतन दिले जात नाही हे सरकारचे अपयश आहे.आजही अंगणवाडी कर्मचारी,आशा वर्कर , गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, घरेलु कामगार मोलकरीण, शेतमजूर असे अनेक असंघटित कामगार काम करीत आहेत.
त्या सर्वांना त्यांच्या अधिकारापासून, हक्कापासून अलिप्त ठेवण्याचे पाप सरकार करीत आहे.कामगार संघटनांनी गेल्या अनेक वर्षापूर्वी सातत्याने संघर्ष करून सरकारला ४४ कामगार कायदे करण्यास भाग पाडले होते परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या कामगार कायद्याची मोडतोड करून ४ श्रम संहिता लागू करून कामगारांना आपल्या हक्का पासून वंचित ठेवण्याचे काम सुरू केले आहे.
सरकारच्या विरोधात आणि असंघटित कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी देशात अनेक कामगार संघटना काम करीत आहेत. भविष्याचा वेध घेता हा लढा व्यापक व्हावा व सर्वांना न्याय मिळावे यासाठी संपूर्ण कामगार युनियन एकत्रित करून तीव्र लढा देण्यात येणार आहे असे प्रतिपादन आयोजित आयटक जिल्हा अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक स्थानावरून कॉ शाम काळे जनरल सेक्रेटरी आयटक महाराष्ट्र यांनी केले.
चंद्रपूर येथील वसंतराव वानखेडे सभगृहात चंद्रपुर जिल्हा आयटकचे एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.या अधिवेशनाचे अध्यक्ष प्रकाश वानखेडे केंद्रीय सल्लगार एम एस ई बी वर्कर फेडरेशन तर प्रमुख अतिथी दिलीप बर्गी जिल्हा अध्यक्ष आयटक, विनोद झोडगे राज्य सचिव आयटक , ज्योती अंडर सहारे राज्य काँसिल सदस्य आयटक, वनिता कुंट्टावार राज्य काँसिल सदस्य, राजू गैईनवार माजी नगरसेवक ,सीमा पवार माजी नगर सेवक भद्रावती आदी मान्यवर उपस्थित होते.