पत्रकार सुभाष शेषकर यांचे दुःखद निधन!
चंद्रपूर – किरण घाटे
समाज कार्याचा वाटाड्या या साप्ताहिकाचे मुख्य संपादक चिमूर निवासी सुभाष शेषकर यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
पत्रकारितेत त्यांनी आपला आगळा वेगळा ठसा उमटविला होता.
दिलदार मित्र म्हणून त्यांची चिमूर तालुक्यातील अनेक गावांत ओळख होती.समाजकार्यात त्यांना विशेष रुची होती.
दिवंगत शेषकर यांना पत्रकार रामदास हेमके, नितीन पाटील, शंकर चव्हाण, सुनिल रामटेके,गौतम गेडाम,महाराष्ट्रातील सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे, रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार सहज सुचलं मित्र परिवारचे मुख्य संयोजक सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार सहसंयोजक सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे साधना धकाते,शैला चिमड्यालवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

