Ballarpur city@ news
• चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर त्वरित आळा घाला !
• गोळीबार प्रकणातील आरोपींना अटक करा- राजू झोडेंची मागणी
सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली असून 3 दिवस आधी चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये गोळीबार करण्यात आला तर आज रविवारी बल्लारपूर शहरात गोळीबारीची घटना घडली त्यात एक जण जखमी झाला आहे. जिल्ह्यात वाढत चाललेली गुन्हेगारी तात्काळ मोडून काढत गुन्हेगारीवर आळा घाला व आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे केली आहे.
बल्लारपूर येथील गांधी चौकात मालू वस्त्र भांडार या दुकानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करून गोळीबार केल्याने दुकानदाराच्या नोकराच्या पायाला गोळी लागली आहे, दरम्यान सर्वात मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानावर अज्ञात व्यक्तींद्वारे आज रविवार दि.7 जुलैला दुपारी 12.00 वाजताच्या सुमारास झालेला पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार यामुळे बल्लारपूर नगरीत एकच खळबळ उडाली आहे.
कधीकाळी शांतताप्रिय असलेला चंद्रपूर जिल्हा हा राजकीय संघटित गुन्हेगारीमुळे क्राईम कॅपिटल कडे वाटचाल करीत असल्याचे विदारक चित्र दिसतं आहे.त्यामुळे आता पोलीस विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना अटक करावी अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी आज पोलिस प्रशासनाला दिला आहे.